Tuesday, 18 November 2014

नवरी आली !!




गोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

गोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


नवर्‍या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली

हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी

सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं




 

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया

भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा

किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली


Friday, 26 September 2014

लसीकरण - इलाजा पेक्षा काळजी बरी.


लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. १ वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. गोवरच्या लसीबरोबर ‘अ’ जीवनसत्त्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे. क्षयरोग प्रतिबंधक लसीला बी.सी.जी. लस म्हणतात. ती डाव्या खांदयावर कातडीमध्ये  टोचतात. बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. १५ दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्याठिकाणी थोडासा व्रण एक ते दिड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील ३-४ महिन्यात कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दिड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा दयावा.
बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात. त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियो प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियो पासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षाने आणखी एक बूस्टर डोस दयावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस दयावा लागतो.गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस बाळाला ९ ते १२ महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवारापासून संरक्षण होण्यास मदत होते.



१) अटेन्युएटेड व्हॅक्सीन –  यामध्ये ऍक्टिव्ह व्हायरस असतो, पण त्याला शक्ती नसते. यामध्ये कांजण्या, रुबेला, गालगुंड (मम्स) व टायफाइड लसी येतात.
२) टॉक्सॉइड व्हॅक्सीन – यामध्ये इनॅक्टिव्हेटेड टॉक्सिक कम्पाउंड्‌स असतात. यामध्ये घटसर्प (डिफ्तेरिया) व टिटॅनस(धनुर्वात) या लसी येतात.
लसीकरणाने जगातील विविध राष्ट्रात कित्येक रोगांवर विजय प्राप्त केला आहे. अमेरिकेत १९५९ साली कांजण्यांच्या ७६३०९४ केसेस सापडल्या व तेव्हा ५५२ लोक मरण पावली. तेच प्रमाण २००८ मध्ये कांजण्यांचे फक्त ६४ रोगी सापडले. त्यांतले ५४ रोगी दुसर्‍या राष्ट्रातून आले होते. ५४ पैकी ५३ लोकांना कांजण्यांचे लसीकरण दिले नव्हते.
आता आपण प्रत्येक लसीविषयी जाणून घेऊ- पहिल्यांदा बीसीजी. कुणालाही विचारा बीसीजी म्हणजे काय? कुणालाच माहीत नसणार! बॅसिलस कॅलॅमिटी गुएरीन. कॅलेमिटी व गुएरीन या शास्त्रज्ञांच्या नावाने ही लस ओळखली जाते. ती लस डाव्या हाताच्या खांद्यावर दिली जाते. अमेरिकेत व हॉलंडमध्ये ही लस मास इम्युनायझेशनने दिली जात नाही. ही लस मुलांच्या अंगात प्रतिकारशक्ती वाढवते. मिलिअरी टीबी व टीबी मेनिंनजायटीसपासून बचाव करते.
भारतात फुप्फुसाची टीबी मोठ्या प्रमाणात आढळते. त्याविषयी ही लस कोणतीही प्रतिकारशक्ती देत नाही. त्या रोगाविरुद्ध ही लस उपयोगी नाही. ही लस आयुष्याची पहिली १५-२० वर्षे या रोगाविरुद्ध संरक्षण देते. कुणी तुम्हास सांगत असेल की बीसीजीची लस टीबी रोखते तर ते अगदी खोटे आहे. असे असते तर राज्यात टीबी चे रोगी सापडले नसते. टीबीचे अनेक प्रकार आहेत. त्यात पाठीच्या कण्याचा टीबी, आतड्यांचा टीबी, गर्भाशयाचा टीबी.. मेंदूचा टीबी याविषयी ही लस संरक्षण करते पण टक्केवारी कमी आहे.
२) डीपीटी ची लस – ही लस पॉलिव्हॅलंट आहे. यात डिफ्थेरिया (घटसर्प) पर्ट्युसीस (कोल्हेखोकली) व टिटॅनस (धनुर्वात) वर एकत्रित केलेली लस दिली जाते.
बीसीजी जन्मतः दिली जाते तर डीपीटी व पोलिओचा पहिला डोस दीड महिन्यानंतर – दुसरा डोस – अडीच महिन्यानंतर तर तिसरा डोस साडेतीन महिन्यानंतर दिला जातो. डीपीटीची लस इजेक्शन रूपाने दिली जाते. तर पोलिओ तोंडावाटे प्यायला देतात. डीपीटी व पोलिओचा बूस्टर डोस वयाच्या एक वर्षानंतर दिला जातो. व नंतर पाच वर्षानंतर डीपीटीचा बुस्टर डोस.
३) पोलिओची लस – १९५२ साली जोन्स सॅक या शास्त्रज्ञाने ही लस शोधली. एल्बर्ट सॅबीन याने १९६२ मध्ये ती बनवली. पहिल्यांदा ही लस इंजेक्शनने दिली जायची. आता ती तोंडावाटे दिली जाते.
१९८८ साली पोलिओचे ३५०,००० रोगी जगात सापडले. तर २०१२ साली फक्त २३३ रोगी आढळले. आज भारत राष्ट्र पोलिओमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तरीदेखील शेजारच्या पाकिस्तानात पोलिओचे रोगी सापडतात तेव्हा आम्ही सदैव जागृत राहायला पाहिजे.

तर लसीकरणाविषयी बीसीजी, पोलिओ, डीपीटी यातील ‘डीपीटी’ची लस याबद्दल आम्ही जाणून घेतले. आता सुरुवात आम्ही डी… पासून करू. डी.पी.टी.तील ‘‘डी’’ म्हणजे ‘‘डिफ्तेरिया’’ म्हणजेच ‘‘घटसर्प’’. कोकणीमध्ये आम्ही त्याला ‘कोटेल’ म्हणतो. तो जंतू म्हणजे सी. डिफ्तेरि – भयंकर विषाणू ज्याने घशाला संसर्ग होऊन घशावर, टॉन्सिल्सवर लवचीक पदार्थ साचला जातो व त्या रोगात मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘पी’’ म्हणजे ‘‘परट्यूसिस’’ – ‘‘हुपिंग कफ’’. हूपचा खोकला, कोल्हे खोकला(डांग्या खोकला). या रोगाचा संसर्ग झाल्यावर रोगी कोल्ह्याप्रमाणे ‘‘कुई’’सारखा आवाज काढत खोकायला लागतो. या रोगात मुलांची छाती भरून येते. न्यूमोनिया होऊन मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘टी’’ म्हणजे ‘‘टिटॅनस’’- ‘धनुर्वात’. हा महाभयंकर रोग म्हणून चर्चिला गेला. तुम्हाला माहीत असेल सटवाई आई ही एका मुलाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मुलाला न्यायला यायची. सगळी घरातील लोकं त्या रात्री जागवायची. दरवाजावर आडवी झोपायची. डबे, ढोल वाजवायची.
खरे म्हणजे या अंधश्रद्धेमागे खोच होती. त्या काळात गरोदर बायका आपल्या घरातच बाळंत व्हायच्या. गावातील सुईण बाई घरी यायची. घरातील एक खोली सारवायची, साफ करायची, मग सगळे बाळंतपण घराच्या त्या खोलीतच उरकायची. मुलाची नाळ कुठल्याही धारदार वस्तूने कापायची. एकेकदा ठेचायची. त्याने मुलांना धनुर्वात व्हायचा व सात दिवसांच्या आत मूल मरायचे.
आज धनुर्वातावर टीटी या लसीचे गरोदर बाईला एक किंवा दोन इंजेक्शने देतात. दुसरे बाळंतपण पहिल्यानंतर दोन वर्षांच्या अगोदर आले तर एकच इंजेक्शन नाहीतर दोन.
मूल जन्मल्याबरोबर दीड महिना त्याच्या रक्तात आईच्या रक्तातील अँटीबॉडीज आलेल्या असतात. तेव्हा डीपीटीचे पहिले इन्जेक्शन मुलांना दीड महिन्यावर, दुसरे व तिसरे दर ४ ते ६ आठवड्यानंतर म्हणजे सगळी तीन इन्जेक्शन. मग दीड वर्षानंतर डीपीटीचे बुस्टर डोस व त्यानंतर पाचव्या वर्षी डीटीचा बुस्टर डोस. बुस्टरचा डोस नेहमी रोगाविषयी रक्तात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीची तीव्रता तशीच ठेवण्याकरता असतो.
मुलांना १० वर्षानंतर मूल जेव्हा पाचवीत असते तेव्हा टीटीचे इन्जेक्शन देता येते. मग १५ वर्षांनंतर १० वीत असल्यावेळी. त्यांच्या मधल्या काळात या लसीकरणाची गरज नाही. लसीकरण हे फक्त मुलांमध्येच विचारात घेतलेले आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले लोक अंधश्रद्धेविषयी बोलणार नाही.
धनुर्वाताचा जंतू म्हणजे सी. टिटॅनी- हा जखमांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतो. तो जंतू मातीत असतो… धुळीत असतो. हा जंतू शरीरात ‘टिटॅनो स्पाझमिन’ नावाचे विष निर्माण करतो व हे विष मज्जातंतूंवर हल्ला करते. रोगी लवकरच दगावू शकतो. डीपीटीच्या लसीकरणाने मरणाचे प्रमाण खालील टक्केवारीने कमी झाले…
घटसर्प – ९५% ; हुपिंग कफ – ८० ते ८५% आणि धनुर्वात – १००%.
पूर्वी अमेरिकेत वर्षाकाठी धनुर्वाताच्या ५८० केसेस दिसायच्या. त्यातल्या ४७२ दगावत असत. आज लसीकरणानंतर वर्षाकाठी फक्त ४१ रोगी सापडतात व त्यातले ४ दगावतात.
कोल्हेखोकला हा रोग संसर्गजन्य आहे. त्याला ‘‘शंभर दिवसांचा खोकला’’ असेही म्हटले जाते.
दर वर्षी लसीकरणाअगोदर या रोगाने जगभर ४८.५ लाख रोगी सापडायचे व त्यातले तीन लाख मरायचे. १९९० साली तो आकडा एक लाख ६७००० वर पोहोचला तर २०१० मध्ये ८१००० रोगी दगावले. १९१२ साली अमेरिकेत सोळा राज्यात या रोगाचा प्रसार झाला. वॉशिंग्टन, विरमॉंट, विनकॉनसीन या राज्यात रोगी. कारण कोणते?…
ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना या रोगाविषयीची लस घेण्यास अटकाव केला त्यांनाच हा रोग झाला. आज परत एकदा लसीकरण मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे व हा रोग तेथे आटोक्यात आलेला आहे.
त्यानंतर आपण विचार करणार आहोत- ‘‘गोवर (मिझल्स)’’ या रोगावरील लसीकरणाविषयी. ही लस लहान मुलांना इन्जेक्शनद्वारे देण्यात येते. पहिला डोस नऊ महिन्यावर देण्यात येतो तर सव्वा वर्षावर ‘एम.एम.आर.’चा डोस दिला जातो. ०.५ सीसी याप्रमाणे त्वचेखाली डोस दिला जातो.
गोवर या लसीचा शोध १९६३ साली लावण्यात आला व १९६८ साली लस तयार झाली. एम.एम.आर.ची लस १९६७-६९ या दरम्यान तयार झाली व मुलांना ही लस १९७१ सालापासून देण्यात आली.
गोवर’लाही लोक मग देवीच मानायचे. कांजण्यासारखेच दोन्ही रोग व्हायरसमुळेच होतात. खूपच संसर्गजन्य रोग आहे हा. गावातील सगळी मुले आजारी पडायची. न्यूमोनियाने रोगी मुले दगावायची. आज लसीकरणामुळे मरणार्‍यांची संख्या खूपच कमी झालेली आहे.
लसीकरण केल्यावरही मुलांना ‘‘गोवर’’ होतो?
हो..! लसीकरण केल्यावरही हा आजार मुलांना होऊ शकतो कारण गोवर या रोगाचे जंतू तीन ते चार प्रकारात मोडतात. एकाच प्रकारावर लस उपलब्ध आहे, बाकीच्यांची नाही. तेव्हा वेगळ्या प्रकारचे गोवरचे जंतू जर शरीरात प्रवेश करते झाले तर मुलांना गोवरचा आजार होऊ शकतो. पण लसीकरण केलेल्या मुलांना कमी प्रमाणात पुरळ उठतो. तापाचे प्रमाण पण कमीच असते.
अमेरिकेत गोवर २००० सालापासून नेस्तनाबूद झाला. तरीही भारतात २००५ साली गोवरचे रोगी सापडले. ज्या मुलांना त्यांच्या पालकांनी लसीकरण करविले नव्हते त्यांच्यातच हे रोगी सापडले.
आज लसीकरणात भर पडलीय ती दोन लसींची-
१. हिपॅटायटीस-बी आणि २. जापनीज एन्सेफेलायटीस (मेंदूज्वर).
१) हिपॅटायटीस-बी ची लस १९८१ पासून तयार झाली. या दोन सालात भारत सरकारने आपल्या या लसीकरण कार्यक्रमात या लसीचा अंतर्भाव केला.
या लसीचे तीन डोस एक महिन्याच्या अंतराने दिले जातात. हे डोस डिपीटीबरोबर दीड-अडीच-साडेतीन महिन्यावर बालकाला दिले जातात. या लसीमुळे २५ वर्षापर्यंत मुलाला प्रतिकारशक्ती मिळते.
या लसीमुळे मुलामध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे.
२) मेंदूज्वर ची लस अमेरिका, ऑस्टे्रलिया व युरोप राष्ट्रांत २००९ सालापासून देण्यात येते. ही लस इन्जेक्शनद्वारे ९ व्या व १८ व्या महिन्यात देण्यात येते.
हा लसीकरणाचा कार्यक्रम ठरला. मुलांना लसीकरणाबरोबर व्हिटामिन ‘अ’चे डोस देण्यात येतात.
मंडळी, तुमच्या मुलांना देण्यात येणार्‍या प्रत्येक लसीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या लसीमुळे कोणत्या रोगांपासून तुमचे मूल मुक्त राहू शकते ते जाणा- व माझ्यावर तेवढे तरी उपकार कराच! काळजी घ्या!



------नवप्रभा

Tuesday, 5 August 2014

रानातून आणलाय रानमेवा



पावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात. शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच, कोणतीही मशागत-मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो.  श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात. या भाज्या एखाद्याच महिन्यात, तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात, त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी, चव चाखावी आणि त्यांचा आस्वादही जरूर घ्यावा. अळंबी – आजकाल बारा महिने मिळणारी पावसाळी भाजी म्हणजे अळंबी. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार आहेत. अळंबी थंड व गोड आहेत. यालाच आपण मशरूम असे म्हणतो. ते शक्तीवर्धक असून पचनास थोडे जड, पौष्टिक आहेत. यात भरपूर प्रथिने असल्याने आहारात सावधगिरी बाळगणार्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व सोडियमचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे आहे. यात ‘‘ब’’ जीवनसत्त्वाचे उपघटक ५ ते ३० % पर्यंत आहेत. त्यामुळे मशरूम ही भाजी आपल्या आहारात आलटून पालटून असावीच. टाकळा, फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, भारंग, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, वेगवेगळे कंद आदी विविध प्रकारच्या भाज्या पावसाबरोबर जमिनीतून उगवून येतात आणि स्थानिक गावकऱ्यांच्या, आणि अपवादाने का होईना पण मुंबईकरांच्याही ताटात दिसू लागतात.

केवळ पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या या रानभाज्यांचे दर्दी मोजकेच असले, तरी एकदा या रानभाज्यांची चव जिभेवर रुळलेले खवय्ये ठरलेल्या ठिकाणी बसणाऱ्या आपल्या ठरलेल्या भाजीवाल्याकडे आवर्जून या
भाज्यांची चौकशी करतात. या भाज्यांचा मोसम जेमतेम दोन-तीन महिन्यांचा. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनपासून ते फार फार तर सप्टेंबरपर्यंत या रानभाज्या असतात. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुले, शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. प्रामुख्याने या भाज्या मिळतात मुंबईच्या उंबऱ्यावरच्या पालघर, सफाळे, वसई, कर्जतजवळच्या लहान- लहान गावांमध्ये. या गावांमधल्या महिला, मुलं पहाटे, खरं तर मध्यरात्रीच या भाज्या खुडण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे अडीच-तीन वाजताच त्यांचे काम सुरू होते. गावात, खाचरांच्या बांधांवर, डोंगरउतारावर उगवणाऱ्या या भाज्या गोळा करून त्या बाजारात घेऊन येतात. मुंबई- उपनगरांत भाजीविक्री करणारे भाजीवाले रानभाज्या खरेदी करून पहाटेच मुंबईच्या दिशेने निघतात. पहाटे चार-पाच-सहा वाजता पालघरहून निघणाऱ्या रेल्वेमध्ये असे भाजीवाले अनेक असतात. पावसाळ्यात त्यांच्या टोपलीत या रानभाज्यांच्याही जुड्या असतात. या भाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात. त्यातही प्रत्येक भाजीचा सीझन वेगवेगळा असतो. गणपतीपर्यंत या रानभाज्या हळुहळू संपत येतात.

या रानभाज्यांचे बी पेरावे लागत नाही. त्याला खतपाण्याचीही आवश्यकता नसते, कीटकनाशके- औषधे यांचाही वापर केलेला नसतो. त्यामुळे या भाज्या पूर्णतः नैसर्गिक, शुद्ध असतात सध्या उच्चभ्रू वर्गात असलेल्या ' ऑरगॅनिक फूड ' च्या फॅडला या भाज्या निश्चितच उपयुक्त ठरतील.

पालघरजवळच्या अनेक भागांमध्ये अनेक कुटुंबांमधल्या व्यक्ती पावसाळ्यात रानात फिरून अशा भाज्या गोळा करून भाजीविक्रेत्यांना विकतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही पद्धत सुरू आहे. पावसाळ्यात या भाज्या मुद्दामून खाव्यात, विशेषतः मराठी कुटुंबांकडून या भाज्यांना अधिक मागणी असते, मराठी वस्त्यांमध्ये या भाज्यांची टोपली घेऊन बसलेले विक्रेते दिसतात, असेही ते सांगतात.


पावसाळ्याच्या काळात या गावांतील स्थानिकांच्या आहारात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या भाज्यांमुळे स्थानिकांना अल्पकाळापुरता रोजगारही मिळतो. शहरी वर्गाच्या कीचनमधून या भाज्या गायब झाल्या असल्या, तरी काही घरांमध्ये या भाज्या आवर्जून शिजवल्या जातात. स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण असलेल्या या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात, असे म्हटले जाते. मात्र या रानभाज्यांमधली व्हरायटी शहरी-उपनगरी भाजी बाजारात तेवढी पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात टाकळा, फोडशी या भाज्याच मुबलक प्रमाणात दिसतात. एरव्ही शेवग्याच्या शेंगा, अळू या जरा गावरान प्रकारांच्या सोबत या भाज्या दिसतात. अळंबीसारखी एकेकाळची गावरान भाजी आज मश्रूमच्या रुपाने फाइव्हस्टार हॉटेलच्या मेन्यूकार्डचा, एलिट सर्कलचा भाग झाली आहे. तेवढ्याच स्वादिष्ट असलेल्या रानभाज्या काही मोजक्यांच्या रसोईचा भाग आहेत. 


टाकळा : महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी ‘टायकळा’ किंवा ‘टाकळा’ म्हणून ओळखली जाते. टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळय़ा पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तवात, रक्तपित्त यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खातात. पावसात होणारा खोकला, शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणं, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खावी.

गोमेटू : तोंडलीसारखी लांबट हिरवी फळं या भाजीला येतात. आमटीत किंवा भाजीत ही फळं घातली असता त्या पदार्थाच्या चवीत वाढ होते. या दिवसात चिखल्यांमुळे पायाला जखमा होतात. अशावेळी निखा-याच्या आगीवर ही फळं भाजून त्याचा गर पायाला लावल्यास जखमा ब-या होऊन पाय आधी जसे स्वच्छ होते तसेच होतात.

कुळू : गवताची पाती तसंच लव्हाळ्याप्रमाणे दिसणारी ही रानभाजी ‘फोडशी’ म्हणून ओळखली जाते. भिजवलेली मुगाची डाळ किंवा चणाडाळीत कांदा घालून केलेली ही भाजी अतिशय रुचकर लागते. या
भाजीमुळे पोटदुखी थांबते.

कुर्डू : कांदा-लसूण घालून केलेली कुर्डूची भाजी पोटासाठी सारक ठरते. या भाजीत लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयातील मुली, महिला यांनी ती आवर्जून खावी. कुर्डूची फुलं तसंच बियांची चटणी लघवीच्या विकारांवर औषधी ठरते.
कुडाच्या शेंगा : पोटाच्या आजारांसाठी ही भाजी गुणकारी समजली जाते. कोवळ्या कुडाच्या शेंगा मोडून, पीठ पेरून परतून केलेली भाजी या दिवसांत अनेक घरांत खाल्ली जाते. कुडाच्या शेंगाची भाजी आणि चटणी मूतखडय़ावर बहुगुणी समजली जाते. या कुडाच्या कांद्यांना अंकुर फुटल्यावर त्यांचीही भाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ही अंकुर फुटलेल्या कांद्याची भाजी कृमी तसंच जंतूंवर गुणकारी ठरते.


कावळा : या भाजीला संस्कृत भाषेत ‘कचाय’ असंही म्हणतात. ओलं खोबरं घालून बारीक पानं असलेल्या कावळ्याची भाजी करतात. कच्च्या कावळय़ामध्ये गोडं दही आणि सैंधव मीठ घालून कोशिंबीरही केली जाते. ही भाजी कफदोषाच्या विविध आजारांवर गुणकारी समजली जाते.

कोळी : या नावाचा कीटक असतो, ते आपल्या सर्वाना माहीत आहेच; पण या नावाची भाजीही असते. या भाजीचं बळीराजाच्या आहारात विशेष महत्त्व आहे. शेतकरीराजा पाऊस पडल्यावर पेरणी, लावणीच्या कामाला लागतो. त्याही पूर्वी तो ‘कोळीच्या भाजी’चा नवेद्य आपल्या कुलदैवतेला दाखवतो.

कंटोळी : ‘कर्टुल’, ‘कंटोळं’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा-खोब-यासहित परतून केली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते.

भोपळयाचा वेल : भोपळ्याच्या कोवळय़ा वेलाची भाजी त्याच्या पानासकट केली जाते. या वेलीत लोह तसंच विविध क्षारांचं प्रमाण अधिक असतं. भोपळ्याच्या केशरी रंगाच्या फुलांच्या भाजीपासून मिळणारं लोह शरीराला पूरक ठरतं. फुलांची भाजी रक्तविकार आणि अंगाचा दाह कमी केल्यास उपयोगी ठरते.

सुरणाचा कोंब : पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कंद रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूंना हिरव्या रंगाची लांब पानं येतात. सुरणाच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार असतात. लाल तिखट, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ टाकून केलेली सुरणाच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.

शेवळ : ‘शेवळ’ किंवा ‘शेवळी’ ही करंगळीच्या जाडीची लाल, पिवळा तसंच जांभळय़ा रंगाची भाजी वातविकारांवर उपयुक्त ठरते. ही भाजी उकडवून तसंच सुकवून वर्षभरही वापरता येते. शाकाहरी तसंच मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या अन्नपद्धतीने ही भाजी तयार केली जाते.

चिवलाचे कोंब : ही भाजी म्हणजे बांबूंचे कोंब. पावसात नवीन बांबू रुजून वर येतात. त्या वेळी ते कोवळे असतात. त्या वेळीच हे बांबूचे कोंब खाण्यासाठी सर्वार्थाने वापरले जातात. पातळ कढण (सूप), भाजी करण्यासाठी ते योग्य असतात. या भाजीत क्षारांचं प्रमाण भरपूर असतं.


सोनअळंबी : अळंबीची खाण्यायोग्य जात म्हणजे सोनअळंबी. प्रथिनं आणि क्षारांचं भरपूर प्रमाण असणा-या सोनअळंबी या आकारानं लहान असल्या तरी पौष्टिक असतात. भाजी, मसाले भात, पुलाव, कढण मध्येही अळंबीचा वापर केला जातो.
बाफळी : पावसाळ्यात बद्घकोष्ठता आणि पोटदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यावर बाफळीची भाजी लाभदायी ठरते. या भाजीच्या बिया कांजण्या, देवी आदी रोगांवर औषध म्हणून तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

श्वेतकांचन : या भाजीच्या फुलांची भाजी दमा, खोकला, कफ, वायू, रक्तविकारावर औषधी ठरते.


चवळी : चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे ‘टॉक्सिन’ शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी पावसाळयात चवळीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा. या त्रासात भाजीचा रस पिण्यासाठी घ्यावा. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात ‘बोके’ म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते.

मायाळू : ‘पोतकी’, ‘उपोदिका’ ही ‘मायाळू’ या भाजीची काही नावं. या भाजीच्या लाल रंगाच्या वेलीवर हिरवी पानं उठून दिसतात. वात आणि पित्तदोषाचा नाश करणारी ही भाजी शुक्रधातूंची वाढ करण्यासाठी उपयुक्त असते. आजारपणात ही भाजी खाल्ली असता तोंडाला चव येते.


शेवगा : या वनस्पतीच्या पानं, फुलं आणि शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. शेवग्याला लाल, पांढरा आणि निळसर-काळपट अशा रंगाची फुलं येतात. यांपैकी लाल फुलं येणारा शेवगा आरोग्यदृष्टय़ा गुणकारी समजला जातो. फुलांची भाजी खाल्ल्याने लघवीस येणारा उग्र दर्प, जडपणा कमी होतो. मात्र जास्त घाम येणं, चक्कर येणं, नाकातून रक्त वाहणं, घसा सुकणं अशी लक्षणं दिसतात तेव्हा फुलांची भाजी खाऊ नये.

अळू : अळूच्या भाजीपासून देठी, ओले चणे-मका तसंच भुईमुगाच्या शेंगाचे दाणे, काळे वाटाणे, फणसाच्या आठळय़ा टाकून केलेली अळूचं साग (जे फतफतं, गरगाट म्हणून ओळखलं जातं), अळुवडय़ा हे पदार्थ तयार केले जातात. अळूच्या कंदांपासून म्हणजे अरवीपासूनही विविध पदार्थ तयार केले जातात. अळूची पानं तसंच देठात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही भाजी सर्वानी आवर्जून खावी. पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं. मात्र बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूच्या कंदापासून बनवलेली भाजी जपून खावी.


अंबाडी : अंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे. अळूची भाजी करताना अंबाडीची फळं तसंच पाल्याचा वापर केला जातो. फळांपासून सासव, किंवा कुठल्याही भाजीत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो. फळं वापरण्यापूर्वी ती तासावी लागतात. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी सांभाळून खावी.

वसूची भाजी : पावसाळ्यात ही मुबलक प्रमाणात आढळते. ‘पुनर्वसू’ या नावानेही ही भाजी ओळखली जाते. पांढरी आणि लाल असे या भाजीचे दोन प्रकार आहेत. साधारणपणे पांढ-या वसूचा भाजीसाठी उपयोग केला जातो. यकृताचे आजार, पोटात पाणी होणं, अंगावर सूज येणं, लघवीला कमी होणं या त्रासात पुनर्वसूची भाजी खावी.

हादगा : ही वनस्पती ‘अगस्ता’ या नावाने ओळखली जाते. शेवग्याप्रमाणेच हादग्याच्या कोवळय़ा पानांचा, शेंगाचा आणि फुलांचा जेवणात उपयोग केला जातो. भोंडल्याच्या खेळात खिरापतीत हादग्याच्या फुलांपासून तयार केलेल्या पदार्थाचा उपयोग केला जातो. जेवणानंतर सुस्ती येणाऱ्यांनी हादग्याच्या फुलांची भाजी नाचणीच्या भाकरीसोबत खावी.


प्रत्येक रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यातच नेहमीच्या भाज्यांचे वाढलेले दर पाहता अनेक ग्राहक रानभाज्याना विशेष पसंती देत आहेत. बहुतेक रानभाज्यांमध्ये औषधी गुण असल्याने भाजीची जुडी १० रुपये तर अळंबी ८० रुपये किलो दराने विकली जात आहे.
शेताच्या बांधावर किंवा माळरानावर मिळणारी भारंगी पोटाच्या विकारावर, दमा व खोकल्यावर गुणकारी आहे. कडवट चवीच्या कुडाच्या शेंगा मूत्रविकारावर उपयुक्त आहेत. टाकळाच्या भाजीमुळे रक्त शुद्ध होते. कोवळया अळूच्या पानांची भाजी जिभेला चांगली चव आणते. टाकळाची भाजी पचायला हलकी असते. तुरट चवीची ही भाजी पित्तनाशक आहे. बहुतेक सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असले तरी प्रत्येक भाजीत विपूल प्रमाणात लोह, तंतुमय पदार्थ तर इतर खनिज आहेत. तसेच या भाज्यांच्या वाढीसाठी रसायनिक खतांचा वापर होत नसल्याने ग्राहकांकडून यांना विशेष मागणी होत आहे.

Friday, 26 April 2013

बायकोची 'किंमत'



''बायको घरीच असते म्हणून तिच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते आपल्याला. तिच्या वेळेची, आवडी-निवडीची, तिच्या दिसण्याचीच काय तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नसते. एवढं होऊनही कधी कुरबुर नसते तिची. जी आपली इतकी काळजी घेते, आपल्यासाठी आयुष्य वेचते तिच्याचकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो."
''का य रे, काय म्हणतंय तुझं रिटायरमेंट?'' फोन लागल्या लागल्या मी दे.ना.ला विचारलं.
दे.ना. म्हणजे देविदास नामदेव फतफते. पण सगळेच त्याला लाडाने दे.ना.च म्हणायचे. जवळजवळ अठ्ठावीस र्वष सोबत काम केलेला माझा सहकारी. आमच्या ऑफिसमधून निवृत्तीची पहिली केस त्याचीच! माझ्यापेक्षा आठेक वर्षांनी तो मोठा असल्यानं तो लवकर निवृत्त झाला होता.
''काही नाही रे, बसलो होतो. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल्स जरा व्यवस्थित लावून ठेवू या म्हटलं!'' तो उत्तरला.
''कागदपत्रं म्हटल्यावर व्यवस्थितच ठेवायला हवीत,'' मी.
''दररोज एकेक फाइल क्लीअर करतोय. काल घराचे कागदपत्र, घरपट्टी, मेंटेनन्सच्या पावत्या, शेअर सर्टिफिकेट, वगरे सगळे व्यवस्थित लावून घेतले. आज बँकेच्या खात्यांची झाडाझडती सुरूकेलीये. ड्रावर चेक करता करता कपाटात एक जुनं पासबुक मिळालं. पासबुकातल्या ३२ वर्षांपूर्वीच्या एंट्री बघून हसायला आलं.''
''ते कशामुळे?'' मी.
''चेकने कुणाला वीस रुपये दिलेय, कुणाला पंचवीस! ७६ सालातली पहिल्या पगाराची स्लिपही सापडली ३७५ रुपयांची! मग जाम जिवावर आलं अशा पावत्या फाडणं.''
''जिवावर येणारच! ऋणानुबंध काय माणसांशीच असतात? ''  मी.
''खरंय ते! सध्या छान एन्जॉय करतोय मी माझी निवृत्ती! दररोजचा कार्यक्रम म्हणशील तर, सकाळी मस्त साडेसहाला उठावं. आंघोळ, चहा वगरे आटोपून हिला मदतीसाठी किचनमध्ये हजर व्हावं. साडेआठनंतर नाश्ता, मग गाठतो तोच आपला नेहमीचा स्टेशनचा रस्ता! नोकरीधंद्याला जाणारे नेहमीचे लोक भेटतात. बरं वाटतं. तासाभरानं रमतगमत कधी भाजी, कधी छोटा-मोठा किराणा घेऊन; तेही बायकोनं दिलेल्या लिस्टप्रमाणे बरं! जाम गडबड होते. दोनदा दोनदा चेक केलं तरी काही तरी विसरतोच आपण! तेव्हा हिचा पारा असा चढतो ना; बघण्यासारखंय एकेक! बाहेरून आलं की, हिला जरा भाजी वगरे कापून द्यावी. मग अकरा ते एक तुझी वहिनी हार्मोनियमच्या क्लासला जाऊन येते. ती आली की जेवण. मग पुढचं आपलं आहेच.''
''एकंदरीत बोअर होत नाहीये तर?'' मी.
''बोअर? दोन-चार वर्षांत तरी नाही होणार. आजपर्यंत मी एकदाही पिठाच्या गिरणीत गेलो नव्हतो..पण परवा तो योग आला. इतकं ऑकवर्ड वाटलं नाऽ.. डोक्यावर डबा घेणं बरं वाटेना म्हणून काखेत धरला. मिनिटांवरच्या गिरणीपर्यंत जाताजाता डबा दोनदा हातातून सटकला. तिसऱ्यांदा पडलाच! गहू सांडतासांडताच राहिले. माझी धडपड पाहून गल्लीतल्या टपरीवरली चार टाळकी आली धावत! त्यातल्याच दोघांनी - काय काका, साधा डबा धरता येत नाही? असं म्हणून माझी टांग खेचणं केलं सुरू! मलाही त्यांची फिरकी घ्यावी वाटली. म्हटलं, 'बोलू नका! काखेत धरून गिरणीपर्यंत नेऊन दाखवा', असं म्हटल्यावर कसंनुसं हसायला लागले.''
''मग?'' मी विचारलं.
''त्यातलाच एक पुढे आला.. पठ्ठा चारच पावलं चालला असेल की, त्याच्या हातूनही डबा धप्पदिशी पडला. डब्याचा घेर मोठा होता ना! गहूही सांडले. खि खिऽ करून बाकी तिघं त्याला चिडवू लागले, 'गन्या, काकांपेक्षा तुलाच म्हातारा म्हनायला पाहिजे!' मीही मनसोक्तहसलो. अख्ख्या गल्लीत तमाशा झाला, पण पोरांची मस्ती मात्र जिरली! त्या दिवसापासून बायकोला  सांगून टाकलं, पुढच्या वेळी गिरणीत मी दिवसा जाणार नाही म्हणून!''
बोलताबोलता तो एकदम भावुक झाला.
''बरं, वहिनी काय म्हणताहेत?'' मी विषय बदलला.
''तीच तर म्हणते! आपण फऽक्त ऐकायचं! कालचीच गोष्ट घे; जरा बसलो होतो पेपर चाळत. तो हिने ढीगभर कपडे टाकले पुढय़ात! मोजले तर वीस होते. 'मोजता काय; इस्त्री करा!' वरून फर्मान.''
''एवढय़ा कपडय़ांना तू घरी इस्त्री केली?'' मी आश्चर्यानं विचारलं.
''काय करणार? इस्त्री न करण्याचं एक्सक्यूजच नव्हतं ना!''
''पुढे तर ऐक,'' म्हणून तो पुन्हा बोलू लागला, ''इस्त्री झाल्या झाल्या ठेवले ऐंशी रुपये तिने माझ्या हातावर! ही घ्या तुमची कमाई; संध्याकाळी मस्त आईस्क्रीम खाऊन या.''
''छान, काम केल्याचा काही तरी फायदा!''
''आपण नुस्ता फायदा-तोटाच बघतो मनू.''
''म्हणजे?'' मी.
''सांगतो. असंच एके दिवशी तिला सहज म्हटलं; 'दात जरा व्यवस्थित घासत जा, पिवळे दिसतायेत.' 'पुरेसा वेळच मिळत नाही हो!' ती. 'वेळ मिळत नसतो, काढायचा असतो. आता तर माझा डबा करायचाही प्रश्न नाहीये,' मी असं म्हटल्यावर म्हणते कशी; 'तुम्ही एक वेळचं जेवण बंद केलंय का? नाही ना; डबा नाही याचा अर्थ खायला लागत नाही असं थोडंच आहे. तुम्ही नसला तरी अनंताचा डबा आहे, त्याचं कॉलेजला जाणंही आहेच! निवृत्त तुम्ही झालायेत; मी नाही! तुम्ही घरी असल्यानं उलट डोक्याचा ताप मात्र वाढलाय.' तसं हे ती वैतागून म्हणाली; पण खूप लागलं माझ्या मनाला. विचाराअंती लक्षात आलं. जिथं तिथं आपण फक्त फायदाच बघत असतो. संसारात तिच्यासारखं समरसून जाणं सात जन्मांत नाही जमणार आपल्याला.. पहाटे उठल्यापासून रात्री अंथरुणावर पडेपर्यंत जरा विश्रांती नसते तिला. चहा कर, डबा कर, पोरांच्या शाळा-कॉलेजचं बघ, कपडे धू, कपडे आवर, भाजी आण, बँकेत जा, सफाई अन् भांडीवाली नाही आली तर ते वेगळं टेन्शन! इलेक्ट्रिकचं बिल, बाबांची औषधं, दळणाचं बघ, अरे हो.. दळणावरून आठवलं, हिला तर पोटाचाही त्रास आहे. मग गिरणीत ही डबा कसा नेत होती देव जाणे! दिवस संपतो, रात्र अर्धी उलटते; हिच्या कामांची जंत्री मात्र काही संपत नाही! रोजची ही अशी सतराशे साठ कामं न चुकता करायची. या सगळ्या गोंधळात स्वत:चे केस िवचरायलाच काय रोजचा पेपर चाळायलाही तिला सवड मिळत नाही. जगातली बित्तंबातमी कळावी म्हणून चॅनल सìफग करीत असतो, पण घरात गहू संपलेय का तांदूळ; याचा आपल्याला पत्ताच नसतो! मला नेहमी वाटायचं रे; संध्याकाळी आपण ऑफिसमधून येतो त्या वेळी हिनं मळक्या गाऊनऐवजी मऽस्तपकी साडी घालून, गजरा-बिजरा माळून दारात आपली वाट पाहावी. तशी गोष्ट फारच छोटी.. पण  इतक्या वर्षांत एकदाही तसं जमून आलं नाही. या सगळ्यांचा एकदा अभ्यास केला तेव्हा बऱ्याच काही गोष्टी जाणवल्या.
ती घरीच असते म्हणून तिच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते आपल्याला. तिच्या वेळेची, आवडी-निवडीची, तिच्या दिसण्याचीच काय तिच्या अस्तित्वाचीही पर्वा नसते. आपल्यासाठी आयुष्य वेचते तिच्याचकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो.''
''खरंय तुझं म्हणणं! संसारगाडय़ाची दोरी तिच्या हाती सोपवून आपण होतो नामनिराळे,'' मी.
''नेभळटासारखं..हं! जे गेलं; ते आता जाऊ दे. निदान आयुष्याच्या उत्तरायणात तिच्यासारखं स्वत:ला झोकून देणं जरी शिकलो, तरी पन्नास टक्के तिला आराम मिळेल. राहून गेलेल्या गोष्टी करता येतील. तशी घरकामातनं पूर्ण रिटायरमेंट तर तीही घ्यायची नाही. मुळात घर म्हणजेच ती असते अन् ती म्हणजेच घर! ती असू दे तर झोपडीही चंद्रमौळी होते अन् ती नसू दे तर करोडोचे फ्लॅटही दगड-मातीच्या िभती ठरतील. चल चल चल, ठेवतो फोन. शेडय़ूल नको बिघडायला. अजून झाडझुड करायचीये,'' असं म्हणून बोलता बोलताच त्याने फोन ठेवला.


--------------- लोकसत्ता 

Tuesday, 19 March 2013

Chhatrapati Shivaji, a Secular King


Chhatrapati Shivaji, a Secular King

Shivaji was a great warrior and king of Deccan, India. Many anti-Muslim historians of India have portrayed him as an anti-Muslim and anti-Islamic, and this concept was used by some politicians of India, especially from Maharashtra for their anti-Muslim propaganda.
But was Shivaji an anti-Muslim king? Surely not, because when we study the life of this great king, we find that many of his military officers and associates were staunch Muslims.The fact is that the king had appointed Muslims on the highest posts in many departments, including his Navy and Artillery. Moreover, many of his bodyguards were from Muslim community. These things clearly tell us that Shivaji was not an anti-Muslim king.
Shivaji’s war was against Mughal Emperor Aurangzeb and Vijapur Sultan Adilshah. Although both these enemies of the king were Muslims, that does not mean that Shivaji was anti-Muslim. It is notable that the army of Aurangzeb which fought against Shivaji was mainly consisted of Rajput Hindus. On the other hand, the army of Adilshah which fought against king Shivaji consisted of mainly Deccan Hindus. Besides that, Aurangzeb and Adilshah, both were not friends, but the enemies of each other. Also, Shivaji was a close friend of Nizam, a Muslim Sultan of Hyderabad.
The great warrior Shivaji always respected Muslim saints. Yakut Baba, a Sufi Muslim saint was one of the king’s spiritual guides.
The king had ordered his Hindu soldiers, that Muslim women and children should not be maltreated, Mosques should be given a protection and if they find a copy of Kuran while the mission, they should handover it to their Muslim colleagues respectfully.
The king had many Hindu enemies and Muslim friends and vice versa. So the fact is that the war which the king fought was just a political war. It had nothing to do with religion. Shivaji was a secular king, but the biased historians wrote false history which lead India to communal wars and disputes between Hindus and Muslims in 20th Century.

King Shivaji’s Muslim Warriors & Associates

Now, it would be interesting to know about the king’s Muslim warriors and associates.
A major part of the soldiers in Shivaji’s army was of Muslims. The well known instance of recruiting Muslims in the king’s army was the batch of 700 Pathans, who left the army of Adilshah of Vijapur and joined the king.
Shivaji’s kingdom was spread on the west coast of India. He needed to safeguard his kingdom from any invasion from the sea, so he built his own navy. He appointed Daryadarang as the Chief of the Navy. Most of the sailors of the king’s navy were Muslims and fishermen.
The king was not a dependent on traditional method of warfare. He always modernized is army. He launched an artillery department in his army. He appointed Ibrahim Khan as the Chief of the Artillery. Here too we see that most of the soldiers in his artillery were from Muslim community.
Cavalry was another important part of King Shivaji’s army. The strength of the cavalry was 1,50000, out of which about 66,000 troopers were Muslims.
Siddhi Hilal was another brave Muslim chieftain in Shivaji’s army. When the king was on fort of Panhala, the army of Adilshah sieged the fort (1660 C.E.). To rescue the king, Netaji Palkar, one of the famous chieftains in Shivaji's army, attacked the enemy. Netaji Palkar was accompanied by Siddhi Hilal. In this battle, Siddhi Hilal’s son Siddhi Wahwah was seriously injured.
Siddhi hilal was killed in the battle of Nesari. When King Shivaji ordered his Commander in Chief Prataprao Gujar to capture Bahlol Khan, a General of Adilshah who had strength of 15000 force, Prataprao Gujar realized that it was not possible with his 1200 cavalrymen. As the king had ordered Prataprao to not to show face unless Bahlol Khan was captured, Prataprao decided not to let his cavalrymen killed. So he with his six chieftains made a suicide attack on Bahlol Khan’s mighty forces. These 7 men are known as 7 Brave Marathas, one of them was Siddhi Hilal.
Kazi Hyder was an emissary of King Shivaji, who later became a Secretary.

Siddi Ibrahim was a Body Guard of King Shivaji. When the King met Afazal Khan at Pratap Gadh, Shivaji was accompanied by 3 Body Guards, Siddi Ibrahim was one of them. Afazal Khan tried to kill the King, but he himself got killed.

List of Shivaji’s Muslim Generals, Chieftains,Associates and Officers

The list of the Muslim Generals, associates, chieftains and officers is a very big, and there were at least 50 very important Muslim Generals in Shivaji’s army. Under each of them, there was a big group of Muslim soldiers.
Here is a small list, I will add more names later.
Siddhi Hilal
Darya Sarang
Daulat Khan
Ibrahim Khan
Kazi Hyder
Siddi Ibrahim
Siddi Wahwah
Noorkhan Baig
Shyama Khan
Hussankhan Miyani
Siddi Mistri
Sultan Khan
Dawood Khan
Madari Mehetar

Tuesday, 5 March 2013

दाम करी काम येड्या, दाम करी काम


वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव
जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥

या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव
कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव
बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास
ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं
संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥


नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम येड्या, दाम करी काम..
दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥




Thursday, 14 February 2013

अस्सल गावरान



गावात अठरापगड जातींचे लोक होते. जैन, मराठा, धनगर, लिंगायत माळी या त्यातल्या जाती प्रमुख. महार, मांग, ढोर, पिचाटी हे त्यांच्या खालोखाल. ब्राह्मणांची आणि मुसलमानांची मोजकी घरे. ख्रिस्ती, पारशी वगैरे कुणी नाहीच. एखाद्याचे नाव दुसर्‍याच्या नावापेक्षा पेक्षा वेगळे असावे, तितकेच गावात जातीचे महत्त्व होते. आर्थिकदष्ट्या मागासलेल्या गटाचा दाखला भरताना शाळेतल्या मुलांना त्यात जातीचा उल्लेख करावा लागे. त्यापलीकडे रोजच्या जगण्यात जातीचा काही संबंध येत नसे. शाळेतल्या वर्गात ब्राह्मणाची मुले त्यातल्या त्यात हुषार होती. पण त्यावरुन स्फोट व्हावे असे त्याचे कुणाला काही वाटत नसे. ब्राह्मणांची काही मुले त्यातल्या त्यात शुद्ध बोलत आणि ब्राह्मणांच्या मुली स्वत:विषयी बोलताने ’मी येते, मी गेले, मी बघीतले’ असे म्हणत. बाकी तमाम लोक, अगदी मुलीसुद्धा  ’येतो, जातो, खातो’ अशी क्रियापदे वापरत.. ब्राह्मणांची काही मुले बाकी कुणब्याच्या मुलांपेक्षा अधिक कळकट आणि घाणेरडी राहात आणि तशीच शिवराळ, अशुद्ध भाषा बोलत. रोजच्या जगण्याचा आणि जिवंत राहाण्याचा संघर्ष इतका प्रखर होता की तुझी जात- माझी जात, तुझी भाषा-माझी भाषा असा वगैरे  विचार करत बसणे कुणाला फारसे परवडण्यासारखे नव्हते. पण तरी कुणी कसे राहावे, कसे वागावे याबाबत गावाच्या कल्पना स्पष्ट, आखीव होत्या. गावातली पाटीलकी, कुळकर्णीपण संपले होते, पण या कुटुंबांना गावात मान होता. गावातले जुने म्हातारे पाटील आणि कुळकर्णी यांच्या शब्दापुढे जाण्याची अगदी त्या वेळच्या नवीन पिढीचीही शामत नव्हती. गावातले म्हातारे कुळकर्णी संध्याकाळी त्यांच्या नातवाचा हात धरुन हळूहळू चालत मळ्याकडे निघाले की रस्त्यावरुन येणाराजाणारा त्यांना आदराने रामराम करत असे. ’दिवाणजी, मळ्याकडं निगालायसा? बर, बर..बरं हायसा न्हवं?’ अशी चौकशी करत असे. गावातले लहानसहान तंटे गावचे पाटीलच सोडवत असत आणि त्यांच्या शब्दांचा अनमान करण्याची कुणाची हिंमत नसे. या सगळ्याच्या बदल्यात या सगळ्या कुटुंबाना सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखे आयुष्य जगावे लागे. रस्त्यावरच्या चिंचेच्या झाडावर दगड फेकणार्‍या कुळवाड्याच्या पोरांकडे कुणाचे लक्षही जात नसे, पण पाटील-कुळकर्ण्यांच्या मुलांना असले काही करण्याची मुभाच नव्हती.
गावातले मुसलमान मोहरमचे पीर बसवत पण त्या पिरांची नावे शिवगोंड पाटील पीर, चावडी पीर अशी हिंदू होती. पिराच्या दर्शनाला सगळा गाव लोटत असे आणि पीर अंगात येणारे  बहुतेक लोक तर बिगर मुसलमानच होते. असंख्य वस्त्रांनी जड झालेला तो पिराचा ताबूत ’तडतड तडतड’ वाजणार्‍या ताशामागे धुपाचा दरवळ घेऊन आमच्या दारात येत असे आणि पिराच्या पायावर पाणी घालायला आणि अंगात आलेल्या माणसाच्या पायावर डोके ठेवायला एकच गर्दी उडत असे. शिवगोंड पाटील पिराच्या आणि चावडी पिराच्या विसर्जनाच्या दिवशी प्रसादाचे सरबत आमच्या घरुन जात असे. दुपारची झोप झाली की माझे वडील दोन घागरी भरुन सरबत तयार करत असत. सरबत म्हणजे काय, तर भरपूर गूळ, सुंठ आणि बडीशेपेची पूड घालून केलेले पातळसर पाणी. मग मशीदीतून कुणी मौलवी एकदोन माणसांबरोबर हातात धुमसत्या नाडापुड्या आणि समोर तो धुंदी आणणारा ताशा घेऊन ते सरबत न्यायला येत असे. पीर हे कुण्या जातीचे नव्हे, तर सगळ्या गावाचेच दैवत होते. सगळ्या जातीचे लोक पिराला नवस बोलत. मला आठवते, आमच्या नव्या विहिरीचे खोदकाम सुरु होते आणि विहिरीला पाणी लागू दे, मग तुला चांदीचा नाल चढवीन असा  वडीलांनी नवस बोलला होता. सुदैवाने विहिरीला भरपूर पाणी लागले आणि तो नवस फेडायला आम्ही घरातले सगळे वाजतगाजत शिवगोंड पिराच्या मशीदीत गेलो. वडीलांनी तो चांदीचा नाल पिरावर चढावला आणि समोर उभ्या असलेल्या माळ्याच्या फणफणून अंगात आले. मशीदीतल्या त्या कुंद, भारलेल्या वातावरणात तो घुमायला लागला. अंगात आलेल्या माणसाचे शब्द काही कळत नव्हते, पण ’तुझे बरे होईल, भले होईल, पोरेबाळे खुशाल राहातील, तुझी शेते पिकतील, तुझ्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडेल’ असे काहीसे तो  मुसलमानी हिंदीत म्हणत  होता. तो उदबत्त्यांचा वास, ती गर्दी, पिरावर चढवलेला तो चांदीचा लखलखीत नाल आणि त्या ताशाच्या तडतडीच्या पार्श्वभूमीवर त्या पीर अंगात आलेल्या लालबुंद डोळ्यांच्या आणि असंख्य घागरी पाणी सतत पायावर घेतल्यामुळे आणि गावभर अनवाणी हिंडल्यामुळे फुटक्या टाचांच्या  माणसाचे कळणारे-न कळणारे शब्द मला आजही आठवतात आणि अंगावर सरसरुन काटा येतो. पिरांच्या विसर्जनाच्या दिवशी तर सगळा गाव बेभान होऊन नाचत असे. स्वत:भोवती गिरक्या घेणारे पीर एकमेकांना स्पर्श करत आणि ’पिरांच्या ’भेटी’ झाल्या” असे लोक म्हणत’. रात्री पिराच्या मैदानात ’खाई’ होई. संध्याकाळपासूनच त्या मैदानात एका उथळ, आयताकार खड्ड्यात मोठमोठी लाकडे पेटवली जात. रात्रीपर्यंत तो खड्डा रसरसत्या निखार्‍यांनी भरुन जात असे. ते इंगळी अंगार फुलले की मग त्यावरुन पिराचे उपासक इकडून तिकडे पळत जात. कुणी हातात ओंजळभर निखारे घेऊन ते वर उधळत असे. ’खाई’ खेळणार्‍या कुणाला कधी भाजले असे माझ्या तरी स्मरणात नाही. रात्री उशीरपर्यंत लोक खाई खेळत आणि अंगाभोवती गोधड्या, कांबळी गुंडाळून विस्मयभरल्या नजरेने प्रेक्षक ती खाई बघत असत. पिराच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री दहा-अकराच्या सुमाराला वाजतगाजत नदीच्या दिशेने जाई आणि गाव विलक्षण शांत, मोकळा मोकळा वाटू लागे. रात्री उशीरा कधीतरी मिरवणुकीत नाचणारे मुसलमान पिराचे विसर्जन करुन परत येत आणि येताना गंभीर, खर्जातल्या आवाजात काहीतरी प्रार्थनेसारखे, मंत्रासारखे म्हणत. गावातल्या शांत, थंड हवेत शे-दोनशे लोकांनी खालच्या सप्तकात म्हटलेले ते स्वर ऐकताना हुरहुरल्यासारखे होत असे. थोडी भीतीही वाटत असे.
गावात सर्वात जास्त घरे जैनांची. जैन समाज हा भगवान महावीरांचा उपासक. गावात दोन जैनबस्त्या होत्या. जैनांची पूजा-अर्चा त्या बस्त्यांमध्ये चालत असे. जैन लोक कष्टाळू आणि पैशाला चिकट. धोतराला ठिगळे जोडून, गाठी बांधून ते वापरतील. स्वत:च्या पैशाने कुणाला कधी अर्धा कप चहा पाजणार नाहीत. पण घरात पाच पाच लाखाचे सोने बाळगतील.  गावातल्या कुणाची (बहुदा गाव सोडून शहरात जाणार्‍या एखाद्या ब्राह्मणाचीच) जमीन विकायची झाली तर जैनाचा आकडा सगळ्यात मोठा असे. जैनांच्यात खास जैनी आडनावाचे लोक होते. टारे, भबुजे, भगाटे, आवटे, कुगे, कर्‍याप्पा, चकोते, टेंगिनकिरे, हातगिणे असली खडबडीत, ओबडधोबड आडनावे. पाटील समाजातल्या बहुतेक मुलांची नावे ’गोंडा’ हा प्रत्यय जोडलेली असत. भीमगोंडा, पायगोंडा, नरसगोंडा, बाबगोंडा अशा नावाची माझ्या वर्गात मुले होती. बाकी मुले चंद्या, शंकर्‍या, विज्या, रावशा, भरत्या अशा नावाची. मुली छ्बू, मंगल, राजी, रुकमी अशा नावाच्या. एकूण गावावर आणि गावातल्या लोकांवर एक उग्र, खडबडीत कळा होती. नदीच्या काठावर वसलेले निसर्गाच्या कुशीतले, प्रेमळ, साध्या, देवभोळ्या लोकांचे पुस्तकातल्या कवितेतले गाव आणि आमचे गाव याचा एकमेकांशी काही संबंधच नव्हता. आमच्या गावातले लोकही तसेच उग्र, मळकट दिसणारे होते. वाढलेल्या दाढ्या, पानतंबाखू खाऊन लालपिवळे झालेले दात, अंगाला एक गावठी दर्प , फाटके, मळके कपडे आणि तोंडात शिवराळ कानडीमिश्रित भाषा असे गावातल्या माणसांचे एकूण रुप असे. बायका एकजात चोपलेल्या, पोराबाळांचे लेंढार सांभाळणार्‍या आणि सासू, नवरा आणि नणंदा यांच्याकडून होणार्‍या छळाने सुकून गेलेल्या असत. गावात जातपात फारशी नव्हती, पण किरकोळ कुरबुरी चालूच असत. त्यांचे कारणही जगण्याचा मूलभूत झगडा असेच असे. कुणाचे पोटरीला आलेले जोंधळ्याचे पीक रातोरात कुणी कापून नेई, कुणाच्या शेतातला बांध कुणी दोन सर्‍या सरकवून घेई आणि बांधावर असलेल्या लिंबाच्या, आंब्याच्या झाडावरुन तर सतत भांडणे होत. हे शेतकरी भांडणे गावात सुटली नाहीत की तालुक्याला जाऊन एकमेकांविरुद्ध कज्जे घालत आणि वकिलांच्या संसाराची सोय करत. वर्षानुवर्षे हे कज्जे चालत आणि तारखेला तालुक्याला गेलेले  वादी-प्रतिवादी संध्याकाळी एकाच येष्टीने तालुक्याहून परत येत. बहुदा पुढची तारीख पडलेली असे. येष्टी ष्ट्यांडावर उतरुन हे वादी प्रतिवादी एकमेकांकडे तांबारल्या नजरेने बघत, खाकरुन धुळीत थुंकत आणि मिशीवर मूठ फिरवत अंधारात आपापल्या घरांकडे चालू लागत. हे वर्षानुवर्षे होत राही…
गावाचे ग्रामदैवत भैरोबा होते. भैरोबा हा धनगरांचा देव. गावाबाहेरच्या देवळात भैरोबाचा उग्र मुखवटा होता. तो नेमका कसा होता हे बाकी कधी दिसले नाही. कारण गाभार्‍यात प्रचंड अंधार असे. श्रावणातल्या तिसर्‍या रविवारी भैरोबाची जत्रा असे. देवाची गावभर पालखी निघे आणि खारीक-खोबरे उधळायला आणि देवाचे दर्शन घ्यायला मोठी गर्दी होत असे. पालखीसमोर भलीमोठी सासनकाठी तोलत धनगर नाचत असत आणि देवावर उधळलेल्या भंडार्‍याने सगळे वातावरण भगवे-पिवळे होऊन जात असे. भैरोबा हे जागृत दैवत आहे, असा गावाचा विश्वास होता. मुले न होणारी जोडपी भैरोबाला ’मूल होऊ दे, तुझ्या कळसावरुन त्याला खाली टाकीन’ असला क्रूर, न समजण्यासारखा नवस बोलत. एकदोन वर्षात तो नवस फेडायला ते जोडपे येत असे. बरोबर असलेल्या लवाजम्यात एक कुंची घातलेले आणि काजळाने डोळे बरबटलेले तान्हे बाळ असे. मग एकदोन माणसे देवाच्या कळसावर चढत. दोनपाच माणसे एक दणकट चादर चारी बाजूनी हातात पकडून हात वर करत आणि मग ती कळसावर चढलेली माणसे त्या तान्ह्या बाळाला अलगद त्या चादरीत सोडून देत. ते अंतर चारपाच फुटाचेच असे, पण ते दृष्य बघताना काळजात धस्स होत असे. ते लहानगे बाळ त्या धक्क्याने कळवळून रडायला लागे आणि सगळे बघे ’भैरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या आरोळ्या देत. रासवट, अडाणी पण चोख श्रद्धेच्या ललकार्‍या उठत. श्रावणात हवा पावसाळी कुंद असे आणि त्या तसल्या आजारी हवेतच देवळाकडे जाणार्‍या वेड्यावाकड्या उंचसखल वाटेवर जत्रेतील दुकाने, हॉटेले थाटलेली असत. भजी, जिलबी, बत्तासे, भेंडबाजे असले गावठी चवीचे पदार्थ त्या हॉटेलांत मिळत असत. एक घोट घेतला की थुंकून टाकावा असे वाटावे इतका गोड चहा गावातले गावडे पुन्हापुन्हा पीत असत. त्यावर चरचरीत तंबाखूचे पान खात नाहीतर कडक वासाच्या गावठी बिड्या ओढत. पानाच्या पिचकार्‍यांनी आणि बिडीच्या कडवट वासाने सगळे वातावरण अफिमी होत असे. भैरोबाच्या जत्रेच्या निमित्ताने गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत, सुदृढ जनावरांच्या स्पर्धा होत आणि जत्रेच्या दिवशी रात्री माळावर तमाशाचा फड रंगत असे. या तमाशाची पटकथा कुणी सेन्सॉर केलेली नसे आणि असली तरी त्या तमाशात काम करणारे नट त्यात ऐन वेळी हशा पिकवण्यासाठी पदरची इतकी वाक्ये घालत, की त्या मूळ कथेला  काही अर्थच राहिलेला नसे. भडक मेकप केलेल्या रावणासमोर उभा असलेला, किंचित पोट सुटलेला कोदंडधारी राम ’रावण्ण्ये, तुजायला लावला घोडा…’ असे म्हणून जबरदस्त हशा घेत असे आणि त्यात कुणाच्या भावना वगैरे दुखावत नसत. पुढे नाचणार्‍या बायका आल्या की मग तर काय प्रेक्षकांत लैंगिकतेचा सामुदायिक उद्रेकच होत असे. प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्यांबरोबर जे शेरे मारले जात, ज्या फर्मायशी केल्या जात त्याने आजही नागर मंडळींच्या कानातले केस जळतील. पण त्या नाचणार्‍या बायकांना आणि इतर तमासगीर मंडळींना त्याचे काही नसे. तसेच अश्लील विनोद होत, सुमार रुपाच्या आणि सुमार बांध्याच्या बटबटीत मेकप केलेल्या बायका तशाच नाटकीपणे नाचत राहात आणि जनता चेकाळून चेकाळून तमाशा बघत राही.
गावातले बरेचसे लोक शेतकरी होते. दोनपाच किराणा मालाचे  दुकानदार, एखादे सायकल दुकान चालवणारा, एकदोन चहाचिवडा देणारी हॉटेले चालवणारे आणि मग इतर बारा बलुतेदार. नोकरी करणारे बहुतेक लोक प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. गावात असलेले एक डॉक्टर आर.एम.पी. पदवीधारक होते आणि दुसर्‍या एका कम्पाऊन्डरने एका मोठ्या डॉक्टरकडे उमेदवारी करुन कसलीही पदवी नसताना स्वत:चा दवाखाना सुरु केला होता. तो लोकांना भसाभस इंजेक्शने टोचत असे आणि त्याच्या हाताला गुण आहे असा समज असल्याने त्याच्या दवाखान्यात तोबा गर्दी होत असे. गावात सतत रोगराईच्या साथी असत. पिण्याच्या पाण्याचे हाल असल्याने पोटाच्या विकारांने, जंतांने आणि नारुने लहान मुले पिडलेली असत. देवीचे जवळजवळ उच्चाटन झालेले होते, पण गोवर, कांजिण्या, डोळे येणे आणि पाचवीला पुजलेला ताप यांनी मुले हैराण झालेली असत. दवाखान्यात येणारे बरेचसे लोकही या ’थंड, ताप, डोसकं’ अशा आजाराने ग्रस्त असत. म्हातारी माणसे दमा, क्षय आणि पक्षाघाताने – गावाकडे त्याला ’लकवा मारणे’ असा शब्दप्रयोग होता- मरायला टेकलेली असत. बायकांची अवस्था तर फारच केविलवाणी असे. जेमतेम पदर येतो न येतो तोच होणारे लग्न, लागोपाठ होणारी मुले, अपुरा आणि नि:सत्व आहार आणि सतत दडपून, कुचमत जगावे लागणारे आयुष्य यामुळे त्या विझून गेल्यासारख्या दिसत. तिशीच्या आत बयाच बायका जख्ख म्हातार्‍या दिसायला लागत, आजाराने ग्रासत आणि झिजून झिजून मरुन जात. जननमार्गाचे आजार, मूळव्याध, अवघड जागी होणारी करटे अशा आजारांबाबत तर संकोच आणि अडाणीपणा यामुळे वर्षानुवर्षे यातना सहन करत त्या जगत असत. हसतमुख, प्रफुल्ल चेहयाचे लोक अगदी अभावानेच बघायला मिळत. तरुण लोकांमध्ये ’दारु पिऊन मरणे’ वाढत चालले होते. चांगल्या, सुसंस्कृत कुटुंबातली मुलेही बघताबघता दारुच्या आहारी जात आणि लवकरच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरुन झिंगायला लागत. त्याच्या घरचे लोक त्याला मारहाण करणे, कोंडून घालणे, दारु सुटावी म्हणून त्याच्या जेवणातून काही देशी औषधे घालणे  आणि अगदी हमखास म्हणजे वेगवेगळ्या देवांना वेगवेगळे नवस बोलणे असले उपाय करत. ती तरुण मुले अंधारलेल्या डोळ्यांनी आणि भकास चेहयाने सकाळीसकाळी दारुच्या शोधात निघालेली दिसली की त्यांच्या मनातला त्यांनी मदतीसाठी चालवलेला आक्रोश ऐकू येत असे. मन कालवल्यासारखे होई. पुढे काही दिवसांनी त्यांच्यातला कुणीतरी गेला असे कळत असे आणि त्याची पांढया कपाळाची तरुण विधवा कुणासमोर तरी बसून रडताना दिसे.
गावातले मरण हे गावातल्या जगण्याइतकेच भीषण होते. घरातले माणूस मेल्यानंतर जितका आक्रोश जास्त तितकी आपली त्या माणसावरची माया जास्त असे लोकांना वाटते, असा सर्वमान्य समज होता. जिवंतपणी एखादी म्हातारी अर्ध्या भाकरीला आणि कोपभर चहाला महाग झालेली असे, पण ती मेल्यावर तिच्या घरात तिच्या लेकीसुनांनी उंच आवाजात चालवलेली रडारड ऐकून वैफल्य येत असे. ’कुटं गेलीस गं माजे बाई… आता मी आई कुनाला म्हनू गं… माज्या हातच्या पोळ्या आता कुनाला खायाला घालू गं…’ असा तो नाटकी उद्रेक आठ-दहा दिवस चालू राही. परगावाहून त्या बाईच्या बहिणी – मावळणी सांत्वनासाठी येत. येष्टी बसमध्ये कडेवरच्या लेकराला भिस्कुट भरवणारी आणि आपल्या पदराने त्याचा शेंबूड पुसणारी बाई येष्टीतून उतरताच जादू व्हावी तशी झिंज्या सोडून कालवा करायला लागे. ’तुला बगायला आलो की गं.. आता कुटं तुला बगू गं….’ अशी कडवी म्हणत अंगावरच्या लुगड्याचा पदर मातीत लोळवत ती बाई रडत-लोळत तिच्या घराकडे जायला लागे आणि तिच्या कडेवरचे लेकरु आतापर्यंत बर्‍या असलेल्या आपल्या आईला अचानक काय झाले हे न कळाल्याने भेदरुन आंग काढी. मुसलमान आणि लिंगायत समाजात मृत व्यक्तींचे दफन केले जाते. लिंगायत समाजात मृतदेहाला खुर्चीवर बसवून दफनभूमीपर्यंत नेले जाई आणि गुलाल उधळलेला, मान लटलट हलणारा तो मृतदेह डोळ्यांसमोरुन बरेच दिवस हलत नसे. काही शेतकर्‍यांचे दफन त्यांच्या शेतातच होत असे आणि मग त्यावर वर्षा-सहा महिन्यांत त्यांच्या मुलांपैकी कुणीतरी दगडी समाधी बांधत असे. हिंदूंची स्मशानभूमी गावापासून दोनतीन किलोमीटर दूर, नदीच्या काठावर होती आणि पावसाचे दिवस असले की कुणाला जास्त झाले म्हटले की लोकांच्या पोटात गोळा येत असे. वरंधार पावसात, चिखल तुडवत ती तिरडी नदीकाठी न्यायची आणि कसलाही आडोसा नसलेल्या ठिकाणी अर्ध्या ओल्या सरणावर  ते दहन करायचे म्हणजे इतरांच्या दृष्टीनेही मरणच होते. एरवी अंथरुणावर खितपत पडलेल्या एखाद्या दुर्लक्षित म्हातार्‍याचा रक्षाविसर्जनाचा –राख सावडण्याचा- कार्यक्रम बाकी जोरात होत असे. शे-पाचशे लोक जमत, त्या म्हातार्‍याच्या आवडीचे पदार्थ आणले जात – त्यात कधीकधी मटण आणि दारुही असे – पिंड मांडला जाई आणि कावळा शिवला की हुकमी हुंदके देऊन त्या म्हातार्‍याचे नातेवाईक एकमेकांच्या मानेवर डोकी टाकत. हे सगळे नाटक अगदी व्यावसायिक वाटावे अशा सफाईने केले जाई. दोनपाच महिने जात आणि त्या म्हातार्‍याच्या नावावर असलेल्या जमीनीच्या मालकीवरुन त्याच्या वारसांमध्ये भांडणे सुरु होत.
गावात लैंगिकतेची ओळख अगदी कमी वयात होत असे. भाद्रपदात गल्लीगल्लीत हेंडकुळे लागत आणि जुगलेली कुत्री उलटी होऊन सुटी होण्यासाठी धडपडत. अशा कुत्र्यांना दगड मारण्यार्‍यांची लैंगिक विकृती आज समजल्यासारखी वाटते. लैंगिक संबंधाची ओळखही न झालेली मुलेही असे करण्यात पुढे असत. (फ्रॉईडची मते त्या वेळी वाचलेली नव्हती!) उकीरड्यावर किडे टिपणार्‍या गावठी कोंबड्यांतील एखादा तुर्रेबाज नर अचानक तिरकी तिरकी धाव घेई आणि ’क्वॅक क्वॅक..’ असे ओरडत, पायातल्या पायात धडपडत पळणार्‍या कोंबडीची मान चोचीत धरुन तिच्यावर चढे. दोनचार सेकंद पिसांचा धुरळा उठे आणि मग तो नर त्या कोंबडीला सोडून परत दाणे, किडे टिपायला लागे. दावणीच्या गाई, म्हशी माजावर – गावाकडच्या भाषेत ’वाफेवर’- आल्या की चारा खाणे सोडून अस्वस्थ होऊन हंबरत आणि पायांनी जमीन उकरत निरणातून सोट गाळत. त्यांच्या डोळ्यांत वासनेचे ते आदिम मूक थैमान दिसत असे. मळ्यातली गडीमाणसे अशा जनावरांना पहाटेपहाटे ’गाभ घालवायला’ गावाबाहेर घेऊन जात असत. लक्कडकोटात त्या गाई, म्हशींना बंद केले की वळूला किंवा रेड्याला मोकळे केले जाई. आपला वरचा ओठ वर वळवून, नाक फेंदारुन तो नर त्या मादीचा कामसुगंध हवेतून शोषून घेई, मग धडपडत आपले वरचे पाय उचलून त्या मादीवर चढत असे. त्याच्या हातभर लांबीच्या लालपिवळ्या सोटाखाली त्या माद्या वाकत,  तोंडाचा आ वासून सुस्कारे टाकत. तो नर नवखा असला तर त्याला हा संभोग नीट जमत नसे. मग आसपास उभी असलेली जाणकार माणसे त्याला मदत करीत. ती कोवळी मादी, तो हपापलेला, कामधुंद नर आणि त्या परमैथुनातून सुख मिळवणारी ती रांगडी, गावठी माणसे असे जणू वासनेचे एक लालभडक, जळते, एकसंध, सलग फिरणारे वर्तुळ तयार होत असे. असा तो नर दोनचार वेळा त्या मादीला जुगला – त्याला दोनचार ’काठ्या’ लागणे असा ग्राम्य पण चपखल शब्दप्रयोग होता – की मग तो कामतृप्त झालेला नर त्या मादीवरुन उतरत असे आणि ती थकलेली पण अत्यंत समाधानी मादी हळूहळू चालू लागे. जणू स्वत:चेच स्खलन झालेले असावे अशा आविर्भावात आसपासचे लोकही पांगत. हे सगळे अगदी उघडपणे, राजरोसपणे होत असे. शनिवारी सकाळच्या शाळेला जाताना तर हमखास दिसणारे हे दृष्य. याचा नेमका अर्थ अगदी लहानपणीच कळू लागे. चौथी-पाचवीपासूनच असले काही दिसले की शाळेला जाणारी लहान मुलेसुद्धा तेथे रेंगाळायला लागत आणि मुली लाजून गडबडीने घाईघाईत चालायला लागत. घराघरांतून पाळलेली मांजरे, छपरांवर, झाडांवर उड्या मारणारी माकडे, उकीरड्यांवर आणि चिखलात लोळणारी डुकरे – हे सगळे प्राणी आपापल्या जोडीदारांबरोबर रत होत आणि पिलावळ प्रसवीत. त्यामुळे पुनरुत्पादन कसे होते हे अगदी पोरवयापासून नीट कळायला लागे.  व्यायला झालेल्या गाईच्या निरणातून स्त्राव गळायला लागला की घरातले लोक गरम पाणी, शिजवलेले राळे अशा तयारीला लागत. तास-दोन तास उठबस करुन मग ती गाय- म्हैस कुंथायला लागे. तिच्या पाठीमागून काळ्यानिळ्या रंगाचा बुळबुळीत फुगा बाहेर येई आणि ती अस्वस्थपणे घशातल्या घशात हंबरायला लागे. तो फुगा  फुटला की मग त्यातून वासराचे खूर आणि डोक्याचा पुढचा भाग बाहेर येई. मग गावातला जाणकार डोक्याचे मुंडासे खोचत पुढे होई आणि हातावर एक थुंक टाकून वासराचे ते पाय धरुन हळूच वासराला बाहेर ओढून काढी. ती गाय-म्हैस तोंडाचा आ वासून एक शेवटची कळ देई आणि मोकळी होई. हे सगळे अगदी नेहमी होत असल्यासारखे होते, त्यामुळे जसे जनावरांचे असते तसेच माणसांचे असणार हे व्यवहारी शहाणपण शिकवण्याची कुणाला काही गरज नव्हती. ’स्टॉर्क’ वगैरे फसवणूकही चालण्यासारखी नव्हती.
गावातल्या वडाराच्या बायका चोळी घालत नसत आणि त्या बायका घाईघाईने चालायला लागल्या की  त्यांची पदराआडची ओघळलेली, थुलथुलीत छाती लुटूलुटू हलत असे. कधीकधी एखादी वडारीण चालताचालता रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबून आपला पदर बाजूला करी आणि आपला सावळा पण पुष्ट, दुधाळ स्तन सुटा करुन नि:संकोचपणे कडेवरच्या मुलाच्या तोंडात त्याचे बोंडूक देई. ते मूल मग हातपाय झाडत चुरुचुरु चोखायला लागे. हे सगळे अगदी चारचौघांत निगरगट्टपणे होत असे आणि यात कुणाला काही विशेष वाटतही नसे. हे सगळे  बघून नजर मेलेली असे. जैनांचे ’निर्वाण’ स्वामी पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. त्यांचे पूर्ण वाढ झालेले केसाळ पुरुषी लिंग बघतानाही काही वाटत नसे. स्वामींच्या पायावर पाणी घालणार्‍या, मोरपिसांच्या झाडूने त्यांचे आसन झाडणार्‍या जैनाच्या बायकांचा त्या स्वामींच्या लिंगाला कधी नकळत स्पर्शही होत असे. अशा स्त्रियांमध्ये काही बालविधवा, काही लहानपणीच देवाला वाहिलेल्या भाविणीही असत. ’निर्वाण भाळ छलु’ (’पूर्ण नग्न फारच चांगले) हे अशा स्त्रियांच्या तोंडी ऐकलेले काही गावठी शब्द आज अतृप्त मानवी लैंगिक भावनांची काही गुंतागुंत सुचवून जातात. त्या वेळी बाकी असले काही डोक्यात येत नसे.
मानवी लैंगिक संबंधाबाबतचे उरलेसुरले कुतुहल लोकांच्या बोलण्यातून शमत असे. गावाकडच्या बोलण्यात शब्दागणिक शिवी असे. या शिव्याही अत्यंत स्पष्ट, चोख आणि नेमक्या असत. त्यातले लैंगिक उल्लेख हे थेट आणि सर्जनशील असत. मानवी कोणत्या लैंगिक अवयवांना नेमके काय म्हणतात हे अगदी लहान वयात कोणत्याही प्रकारचे लैंगिक शिक्षण न घेता कळाले याचे कारण आसपास असलेले उघडे, बिनईस्त्रीचे वातावरण. चौथीपाचवीतला एखादा थोराड मुलगा हातची मूठ बांधून करंगळीशेजारी तळव्याच्या त्वचेला पडणाया घडीकडे बोट दाखवत काही सूचक, चावट बोले आणि आसपासची तशीच थोराड मुले फिदीफिदी हसत. गावाकडच्या कसदार खाण्याने, भरघोस कष्टाने आणि मोकळ्या वागण्याने मुले-मुली लवकर वयात येत. सातवी-आठवीत बहुतेक प्रत्येक मुलगी महिन्यातून चार दिवस शाळेला येत नसे आणि पाचव्या दिवशी ती न्हाऊन शाळेत आली की एखाद्या पुष्ट मक्याच्या कणसासारख्या दिसणार्‍या त्या सुस्नात मुलीकडे बघून वर्गातली काही दांडगी मुले अत्यंत वाह्यात असे काही बोलत. असले सगळे आसपास असताना काही शिकायचे राहिले असे होत नसे. आठव्या-नवव्या इयत्तेत असलेल्या पण वयाने बयाच थोर असणाया मुलांच्या शरीरात ज्वानीच्या अनावर लाटा उसळत. त्यातली काही पैसेवाली मुले चक्क वेश्यांकडे जात. बाकीची मुले गावातच निचर्‍याचे साधन शोधत. गावात चोरटे लैंगिक संबंध तर वाट्टेल तितके असत. एखादी जून, अनुभवी, पाशमुक्त ठसठशीत वडारीण किंवा चांभारीण आणि तिच्याकडून आपली कामतृषा भागवणारी कोवळी पण जोरकस मुले असले काही त्या काळात ऐकू येत असे, दिसतही असे.
गावातली बोलीभाषा अगदी रांगडी, खेडवळ होती. सीमाभाग असल्याने गावातले बरेचसे लोक कानडी बोलत. पण त्या नम्र, गोड भाषेचा आमच्या गावात बोलल्या जात असलेल्या भाषेशी अंघोळीइतकाही संबंध नव्हता. गावातली बोलीभाषा खडबडीत उतारावरुन टमरेल खडखडत जावे तशी होती. गावात सदैव वचावचा भांडणे चालत आणि भांडणात एकमेकांच्या आईमाईचा स्वच्छ, बिनकासोट्याचा उल्लेख होत असे. एखादा दारुडा नवरा संध्याकाळी बायकोच्या झिंज्यांना हात घालत “रांडे, उंडगे, कुनाकुनाखाली झोपलीस आं?” म्हणत तिला बडव बडव बडवत असे आणि ती चवताळलेली बाई त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत “आयघाल्या, बाराबोड्याच्या, तुज्या शेमन्यात जोर आस्ता तर मी कुनाकडं कशाला गेलो आस्तो रं हांडग्या..” असं जोरजोरात ओरडत असे. काम न करता दुपारी झोपणार्‍या आपल्या पोटच्या मुलाला एखादा गांजलेला बाप बांधावर उभा राहून ’नाड खज्जाळीच्या, तुज्यायला लावला डॉंबारी..” म्हणून शिव्या देत असे आणि विहिरीवर पाण्यासाठी भांडताना बायका एकमेकीला “व्हयमाले, तुला वड्याच्या काटानं मांगानं हेपल्लला गं रांडं..” असं मोकळेपणाने म्हणत असत. या शिव्यांमधला जहरीपणा जाऊन त्यांची निव्वळ फोलपटे शिल्लक राहिली होती. शाळेतली मुलेही एकमेकाशी बोलताना सहजपणे ’रांडेच्या’ वगैरे शब्द वापरत. हे सगळे अगदी मोठ्मोठ्यांदा बोलले जाई. गरीबी, अडाणीपणा, रोगराई, व्यसनाधीनता या सगळ्यांमुळे टेकीला आलेले हे पुरुष आणि पोराबाळांचे लेंढार, नवर्‍याचा उन्मत्तपणा, सासुरवास आणि कष्ट- न संपणारे अपरिमित कष्ट यांनी मरायला टेकलेल्या पण लवकर न मरणार्‍या बायका – हे सगळे लोक असे तोंड फुटल्यासारख्या शिव्या द्यायल्या लागले की ते सगळेच आपल्या ठसठसणार्‍या गळवासारख्या आयुष्याला आणि असले बिनबापाचे, कणाहीन निरर्थक  आयुष्य देणाऱ्या त्या कृपासिंधू करुणाकरालाच शिव्या देत आहेत, असे वाटत असे.



---------------- sanjopraav