नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर
नळदुर्ग गाव आहे. या गावातच नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.
स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.
नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे.
सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजुच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्या सारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरुपी पाणी
साठून रहाते. त्यामुळे या बाजुने शत्रुला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे.वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजुला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात . असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे
पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्या बंधार्यामध्ये जलमहाल आहे. या बंधार्याची उंची १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्यामध्ये चार मजले आहेत. बंधार्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधार्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महीरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. याचा अर्थ असा होतो की, या जलमहालाकडे दृष्टी
टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. नळदुर्ग किल्ला त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहाळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ दरवाजाचा वक्राकार मार्ग यामुळे चांगलाच लक्षांत रहातो.
स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.
नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे.




किल्ल्याच्या पश्चिमेला बोरी
नदीचा मूळ प्रवाह वाहतो. तेथे शिलक धबधबा असून पर्यटक या ठिकाणी आवर्जून
हजेरी लावतात. पाणी महालावरील धबधबे, शिलक धबधबा आणि रामडोहचा धबधबा इत्यादी गोष्टी आणि नल-दमयंती या जोडीशी नाते सांगणारा हा किल्ला चांगला १-२ दिवसांचा वेळ काढुन बघण्यासारखा आहे.
No comments:
Post a Comment