Tuesday 3 April 2012

आयुष्यावर बोलू काही .....



आरोग्य हे कधीही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच पहिल्या टिप्स आरोग्याच्या
  भरपूर पाणी प्या.
ब्रेकफास्ट राजासारखा घ्यावा, दुपारचं जेवण एखाद्या राजकुमारासारखं आणि रात्रीचं एखाद्या भिकाऱ्यासारखं. (खरं तर ही म्हण इंग्लिशमध्ये ऐकायला जास्त चांगली वाटते. आपण मराठी माणसं सर्वसाधारणपणे रात्रीचं जेवण भरपूर जेवतो. म्हणूनच ही म्हण खास मराठीत.) कसं खावं नि किती खावं याचं मार्गदर्शन करणारी ही म्हण कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे.
हिरवं अन्न अधिक खावं. म्हणजे अर्थातच पालेभाज्या, भाज्या, कडधान्यं. पण बटाटा, कंद यासारखं अन्न कमी प्रमाणात खावं.
जगण्यासाठी तीन ‘ई’ महत्त्वाचे आहेत. एनर्जी, एन्थुझिएझम, एम्पथी
तुम्ही नास्तिक असलात तरी प्रार्थना, ध्यान-धारणा आणि योगासनं करायला हवीत. कारण ह्यात मिळणारी शांतता फार महत्त्वाची असते, आजकालच्या आपल्या आयुष्यात शांत वेळ कुठेतरी गायब झाली आहे.
टीव्ही बघण्यापेक्षा कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स खेळा. जरा रिफ्रेशिंग वाटेल.
काही पुस्तकं वाचली का तुम्ही? वाचन केलं नसेल तर  नक्की काही पुस्तकं वाचा. जर भरपूर पुस्तकं वाचली असतील तर त्यापेक्षाही जास्त वाचा.
झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते. म्हणूनच दररोज सात तास झोपा. पण अति झोप टाळणंही आवश्यक आहे.
रोज किमान १० ते ३० मिनिटं चालणं आवश्यक असतं. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, असं म्हणतात. पण ते असं का म्हणतात, हे किमान काही दिवस चालल्याशिवाय कळणं शक्यच नाही. म्हणूनच चाला..
नेहमी आनंदी आणि तणावमुक्त राहा, काळजी केल्याने अडचणी कमी होत नाहीत. अडचणीवर मात करण्याची पराकाष्टा करा किंवा ते शक्य नसेल तर त्या गोष्टींची काळजीच करू नका.
आपल्या आवडत्या (पण भिन्न लिंगी) व्यक्ती बरोबर किमान तासभर वेळ घालवा. 

--------------------------------

आरोग्य सांभाळलं की आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम होतोच. स्वाभाविकच हा आत्मविश्वास पर्सनॅलिटीच्या माध्यमातून डोकावायला लागतो. पण ही पर्सनॅलिटी अधिक इम्प्रेसिव्ह व्हावी यासाठी आणखी प्रयत्न करायलाच हवेत. 

स्वत:ची तुलना इतरांशी कधीच करू नये. त्यांचा प्रवास कशासाठी आणि कोणत्या दिशेने सुरू आहे, याची तुम्हाला कल्पनाच नसते. मग तुलना अर्धवट होते. त्यामुळे तुलना टाळणं हे सगळ्यात उत्तम.
आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. त्या नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वागण्यावर होत असतो. म्हणूनच या नकारात्मक गोष्टी जितक्या टाळता येतील, तितक्या टाळाव्यात. तुम्ही असे नकारात्मक विचार मनात कधीच आणू नका, ज्यांच्यावर तुम्ही नियंत्रणच ठेवू शकणार नाही आणि भरकटत जाल. त्यापेक्षा तुमची एनर्जी सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात वापरा.
एखादी गोष्ट किती प्रमाणात करायची, हे प्रत्येकालाच माहीत असतं. म्हणूनच अतिरेक टाळा. मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं.
स्वत:ला किती सिरिअसली घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. इतर जण आपला फार विचार करत नसतात, ना आपल्याला फार सिरिअसली घेत असतात. त्यामुळे थोडं चील करायला हरकत नाही.
गॉसिप करायला मजा येते, हे खरं आहे. पण तरी गॉसिप करण्यात, त्यानंतर त्या गोष्टींवर विचार करण्यात आपण बरीच एनर्जी वाया घालवतो. म्हणूनच सेव्ह युअर एनर्जी. गॉसिप करू नका.
जागेपणी स्वप्नं बघा, ती स्वप्न पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त असतात.
दुसऱ्यांवर जळणं हे तर सगळ्यात वाईट. तसं जळून काही मिळत नसतं. तुम्हाला जे हवं ते तुमच्याकडे खरं तर सगळं असतं किंबहुना आहे. फक्त त्याची तुम्हाला जाणीव नसते.
भूतकाळ विसरा. सांगणं सोपं, करणं कठीण.. माहिती आहे. पण ते विसरून पुढे जाताना आनंद मिळतो. भूतकाळ सोबत घेऊन गेलं की ओझं कायम वाढतच जातं. तुमच्या पार्टनरच्या भूतकाळातल्या चुकांची त्याला किंवा तिला कधीच कायम आठवण करून देऊ नका. तुम्ही त्या भूतकाळापायी वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडवता.
इतरांचा तिरस्कार करू नका. तुमच्या शब्दांतून पाझरणारा तिरस्कार तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करतो. हसरा चेहरा सगळ्यांनाच आवडतो. आणि तसंही आयुष्य फार मोठं नाही. किती काळ असा तिरस्कार करण्यात घालवणार आहात?
तुमच्या भूतकाळाशी तडजोड करून मोकळे व्हा. म्हणजे वर्तमान डिस्टर्ब होणार नाही.
तुमचा आनंद इतरांवर अवलंबून कधीच नसतो. तुम्हाला आनंदी वाटलं तर तुम्ही आनंदी होता आणि तुम्हाला दु:खी वाटलं तर तुम्ही दु:खी होता. याची जाणीव कायम बाळगा आणि इतरांच्या बोलण्यामुळे दु:खी, उदास होणं टाळा.
आयुष्यामध्ये आपण निरंतर शिकत असतो. हे जीवन ही खरोखरच एक शाळा आहे. आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या समस्या काही काळापुरत्या येतात, आपल्याला नव्या गोष्टी शिकवून निघून जातात. पण आपण त्या समस्या कायम लक्षात ठेवतो. त्यातून काय शिकायला मिळालं हे विसरतो. म्हणूनच काय शिकलो ते लक्षात ठेवा, त्या वेळचा त्रास आणि अश्रू लक्षात ठेवून काय उपयोग?
हसा आणि लठ्ठ व्हा, असं आपण कायम म्हणतो. अर्थात लठ्ठ होऊ नका पण पोटभर हसा नक्की. त्यामुळे तुमची फेस व्हॅल्यू वाढते.
प्रत्येक वाद आपण जिंकायला हवं असं काही आवश्यक नसतं. आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही हे आपल्याला माहीत असलं तर पुरेसं आहे. इतरांना का पटवून द्यायचं?
आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या समस्या काही काळापुरत्या येतात, आपल्याला नव्या गोष्टी शिकवून निघून जातात. पण आपण त्या समस्या कायम लक्षात ठेवतो. त्यातून काय शिकायला मिळालं हे विसरतो. म्हणूनच काय शिकलो ते लक्षात ठेवा, त्या वेळचा त्रास आणि अश्रू लक्षात ठेवून काय उपयोग?
-------------------------------------

अशा हेल्थ आणि पर्सनॅलिटी टिप्स मिळाल्यावर आपण स्वत:त तर नक्की सुधारणा घडवून आणू शकतो. पण आपली समाजाप्रतीही काही कर्तव्यं असतात. त्या कर्तव्यांचा विचार करायला हवा. पण ती कर्तव्यं कपाळाला आठय़ा घालून पार पाडण्यात काहीच अर्थ नाही.


कुटुंबातल्या सगळ्यांशी बोला. त्यांची विचारपूस करा. कुटुंबापासून लांब राहत असाल तर त्यांना फोन करा. त्यांची काळजी घेणारं कोणी आहे याची जाणीव करून द्या.
प्रत्येक दिवशी इतरांना चांगलं द्यायचं प्रयत्न करा. हे चांगलं म्हणजे एखादी वस्तू असावी असं नाही, हे चांगलं म्हणजे एखादं छानसं हसूही असू शकतं किंवा कोणाची समस्या ऐकून घेण्यासाठी दिलेला वेळही असू शकतो.
कोणत्याही चुकीसाठी त्या व्यक्तीला क्षमा करा. ती क्षमाशील वृत्ती अंगी बाणवली तर आपल्यालाच शांत वाटेल.
आपल्याला आयुष्यात दोन वेळा बालपण अनुभवता येतं. एक तर खरं बालपण आणि दुसरं म्हणजे वृद्धत्व. या दोन्ही वयातल्या निरागस गोष्टी अनुभवण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवा. खूप काही शिकायला मिळेल.
दर दिवशी किमान तीन लोकांना हसवायचा प्रयत्न करा. इतर हसले की आपल्याला नक्कीच बरं वाटतं..
इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार तुम्ही कशाला करायचा? तसा विचार केल्याने इतरांचे विचार तर बदलत नाहीत आणि तुम्हीही इतरांबद्दल विचार करताच की ! मग त्यात वेळ का घालवायचा?
जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुमची विचारपूस कोण करतं? तुमची काळजी कोण घेतं? तुम्हाला बरं वाटावं म्हणून कोण प्रयत्न करतं? तुमचे घरचे आणि तुमचे मित्र.. त्यांच्याशी केवळ गरजेपुरतं बोलू नका. कायम संपर्कात राहा.
-----------------------------------------------
आयुष्यात कोणत्या गोष्टी करायच्या त्याचा विचार करणंही गरजेचं आहे. 

जे काम तुमचे म्हणून ठरविण्यात आलेले आहे ते कुठल्याही परिस्थितीत तुम्हीच वेळेवर पूर्ण केले पाहिजे. तुमचे कर्तव्य तुम्हाला प्राणाहून प्रिय हवे. अगदी मृत्यूलाही तुमची कामे पूर्ण करूनच सामोरे जा.
कामाला त्याच्या महत्त्वानुसार योग्य क्रम लावावा, तातडीच्या कामांना पहिल्यांदा हात घाला.
योग्य गोष्टीच करा. मनाला त्या गोष्टी योग्य वाटल्या पाहिजेत तरच त्या करताना मजा येते.
  ज्या गोष्टी चांगल्या नाहीत, सुंदर नाहीत, आनंदी नाहीत त्यांच्यापासून चक्क सुटका करून घ्या.
देवावर विश्वास ठेवा. तो सगळ्या दुर्दैवी गोष्टींवर उपाय सांगत असतो. आपले कान फक्त उघडे हवेत.
परिस्थिती कितीही चांगली किंवा वाईट असो, ती बदलते एवढंच अंतिम सत्य आहे.
तुम्हाला कसंही वाटत असू दे, उठा, तयार व्हा आणि जगाला समोरं जा.
बेस्ट गोष्ट अजूनही आयुष्यात घडणार आहेत. आयुष्य संपलेलं नाही. त्यामुळे जरा वाट बघा आणि आशावादी राहा.
जेव्हा तुम्ही सकाळी जिवंत उठता, तेव्हा देवाचे आभार मानायला अजिबात विसरू नका. हा सुंदर दिवस तुम्हाला त्याच्यामुळे दिसत असतो.
तुमचं अंतर्मन हे कायम आनंदी असतं पण ते तुम्हाला कळत नाही. म्हणूनच कायम आनंदी राहा. आणि सगळ्यात शेवटी
या टिप्स इतरांनाही सांगा, म्हणजे त्यांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल होतील आणि त्यांना आनंद मिळेल.


No comments:

Post a Comment